आवाज महाराष्ट्राचा.LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, जनता आघाडीकडून श्री.सुहास सर्जेराव ठोंबरे आणि काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीकडून सौ.जयश्री स्वप्निल मंडले यांनी आपले उमेदवारी अर्ज आटपाडी व खानापूरचे मुख्याधिकारी श्री.वैभव हजारे यांच्याकडे सादर केले आहे.
ही निवडणूक येत्या १७ जून रोजी पार पडणार असून, या उमेदवारीमुळे खानापूरच्या राजकीय वातारणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून स्थानिक राजकारणात रंगत वाढत या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या निवडणुकीसाठी जनता आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असून खानापूरच्या राजकीय वातावरणात उत्साहाचे व सामाजिक चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे आज अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १७ जून २०२५ (मंगळवार) रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापासून ते निकाल घोषणे पर्यंतचा तपशील जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार देण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
११ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुख्याधिकारी, खानापूर नगरपंचायत यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे.
त्याच दिवशी, दुपारी २ वाजता पुढील तपासणीसाठी अर्ज दाखल झालेल्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जांची छाननी व उमेदवारांची यादी तयार होईल.
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
अंतिम यादीत असलेल्या उमेदवारांची सूचना प्रसिद्ध केली जाईल.
१६ जून रोजी मुख्याधिकारी यांच्याकडून निवडणुकीसंदर्भातील नामनिर्देशन पत्र मागवले जातील.
१७ जून रोजी सकाळी १२ वाजता मतदान होईल आणि त्यानंतर लगेच मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल.








